थायलंडला पोचल्यावर

बँकॉकचा विमानतळ कुलच्या पेक्षा फ़ारसा चांगला नव्हता. सरकते रस्ते कमी होते आणि स्वच्छताही जरा कमीच होती. सिंगापोरचा व्हीसा असेल तर थायलंडचा व्हीसा ऑन अरायव्हल मिळू शकतो. तिथल्या अधिकार्याने व्हीसा आणि इमिग्रेशन एकदम केल्यामुळे जरा लवकर बाहेर पडता आले.
श्री. गुंदेचा ह्यांची एक पेटी तुटल्यामुळे वाचलेला वेळ वाया गेला. ३० मिनिटांच्या प्रतिक्षेनंतर आम्ही गाडीमधे बसलो.
पहिल्या दर्शनात मला बँकॉक हे सुधारीत मुंबईप्रमाणे वाटले. झोपडपट्ट्या, गटारे हे सर्व आहे पण ह्याला चांगली शिस्त आहे. मुख्यत: स्वच्छता आणि वाहतुकीची शिस्त हे सर्वात पहिल्यांदा जाणवते.
८०% बौद्ध असल्यामुळे सगळीकडे मंदिरांची संख्या जास्त आहे. त्यातील हे एक अर्धनारीनटेश्वराचे मंदिर.दुपारचे ३ वाजले असल्यामुळे खूप भूक लागली होती. रेड चिली ह्या हॉटेल मधे आम्ही भारतीय जेवणाचा आस्वाद घेतला आणि मग पटायाच्या रस्त्याला लागलो.
ते पटाया हे अंतर सुमारे १६५ कि.मी. आहे आणि २ ते २:३० तासांमध्ये हे अंतर पार करता येते. हा पटाया पर्यन्तचा प्रवास अंदाजे २४ तासांचा झाला.
संध्याकाळी ६ वाजता आम्ही हॉटेल पटाया सेंटर मधे पोचलो. (मंगळवार ३० मे २००६).

0 Comments:
Post a Comment
<< Home